Monday, September 19, 2016

पाकिस्तानला धडा शिकविण्याचे काही अहिंसक उपाय


पाकिस्तानला  चांगले ठाऊक आहे, भारतीय नेता गीदड भभकी देण्यापलीकडे काही करत नाही.  भारतीय संसदेवर आक्रमण झाले, मुंबई हल्ला  झाला तरी आपण काहीच केले नाही. पाकिस्तानशी कसे वागावे यावर सल्ला देणारा भारतीय थिंक टेंक म्हणजे आंग्ल भाषा जाणारे अधिकारी, विशिष्ट विश्वविद्यालयांंत शिकलेले विचार जंतू.  या  लोकांना देशापेक्षा स्वत:च्या हिताची जास्त चिंता असते. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी  भारताने नमते घ्यावे असाच त्यांचा नेहमी सल्ला असतो. आपले राजनेता त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यानुसार रणनीती आखतात. शिवाय भारतीय बुद्धीजीवी (बुद्धी नसलेले) आणि मिडिया (?) पाकिस्तानशी संबंध कसे  चांगले करावे यावरच जोर देतात. 

युद्ध हा शेवटच पर्याय असतो. कधी कधी युद्धात विजयी सुद्धा पराजित ठरतो. हजारोंच्या संख्येने सैनिकांचा जीव जाऊ शकतो. देशाला हि अतोनात नुकसान होते.  पण आपल्या सैनिकांचे रक्त काही पाणी नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष  करणे हि उचित नाही  (आतापर्यंत आपण हेच करत आलो आहे).  पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी युद्धाशिवाय जे काही उपाय करता येणे शक्य आहे, शीघ्र केले पाहिजे. 

भारताने स्पष्ट करावे जो पर्यंत पाकिस्तान आतंकवादी हाफिज सईद, मसूद अझहर इत्यादींना भारताच्या हवाली करत नाही तो पर्यंत कुठली हि वार्ता भारत पाकिस्तानशी करणार नाही. अर्थात अश्या घोषणांचा पाकिस्तानवर काहीही प्रभाव पडणार नाही. मग पुढे काय?

गांधीजीनी अहिंसा आणि असहयोगचा मंत्र दिला होता.  आपण गांधीचींचा असहयोग मंत्राचा वापर 'सरकारात इच्छा शक्ती असेल तर उद्याच पासून सहज करू शकतो.  म्हणतात न,  प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतो. पाकिस्तान जर  नंगा झाला आहे तर  असहयोग मंत्राचा वापर करताना नीती मर्यादा विसरून नग्न व्हायला हरकत नाही. पाकिस्तानी जनतेला कळेल असे उपाय केले पाहिजे. 

बॉलीवूडचा प्रभाव पाकिस्तानी जनतेवर आहे. पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना भारतात काम करायला तत्काळ पाबंदी लावली पाहिजे. या शिवाय त्यांचे गाणे इत्यादी भारतातल्या कुठल्याही प्रसार माध्यमांत दाखविण्याची बंदी मग गुलाम अली का असोना.

पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणे सोडावे व  देशात प्रसार माध्यमांना पाकिस्तानी क्रिकेट दाखविण्यावर पाबंदी लावावी.  या शिवाय जो  देश पाकिस्तान सोबत क्रिकेट संबंध ठेवेल किंवा मालिका खेळेल त्या सोबत भारत  खेळणार नाही असे धोरण आखण्यात क्रिकेट बोर्डला बाध्य करणे. मग वर्डकप का असेना. (८०% रेवेन्यु आपण देतो, बेशरम बनायला हरकत नसावी).  

जगाला स्पष्ट सांगावे सिंधू नदी समझौता भारताला मान्य नाही. आज पासून भारत आपल्या गरजेचे पाणी वापरल्यानंतर उरलेलेच पाणी पाकिस्तानला देणार. तत्काळ रावी- व्यास लिंक नहर बनविण्याची घोषणा करावी. (उद्याच करता येते). युनो किंवा इतर अंतराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानने किती हि ओरड केली तरी त्या कडे लक्ष्य देण्याची गरज नाही. या घटकेला कुठलाही देश आपल्यावर दबाव टाकू शकत नाही. स्पष्ट सांगावे आतंकवाद पोसाणार्यांना आम्ही पाणी देऊ शकत नाही. पाणी  किंवा आतंकवाद हे गणित पाकिस्तानला मान्य करावेच लागेल. युद्ध पुकारणे पाकिस्तानच्या बसचेही नाही, हे ध्यानात ठेवा. तसे असते तर काश्मीर वरून केंव्हाच युद्ध सुरु केले असते. 

शिवाय इतर अन्य उपाय पण उद्या पासून अमलात आणू  शकतो, उदा: वाघा बोर्डर वरची सेरेमनी बंद करता येते. केलीच पाहिजे.  समझौता गाडी, बस सर्विस तत्काळ प्रभावाने बंद करावी. या सेवा बंद झाल्याने जास्त नुकसान पाकिस्तानचे आहे. 

अर्थातच  तथाकथित  बुद्धीजीवी  वरील उपायांचा विरोध करतील.  पण अश्या मूर्खांची पर्वा करायची गरज नाही.  क्रिकेट आणि पाण्याची भाषा पाकिस्तानी जनतेला व राजनेत्यांना  चांगलीच कळेल.  

No comments:

Post a Comment