Monday, September 19, 2016

पाकिस्तानला धडा शिकविण्याचे काही अहिंसक उपाय


पाकिस्तानला  चांगले ठाऊक आहे, भारतीय नेता गीदड भभकी देण्यापलीकडे काही करत नाही.  भारतीय संसदेवर आक्रमण झाले, मुंबई हल्ला  झाला तरी आपण काहीच केले नाही. पाकिस्तानशी कसे वागावे यावर सल्ला देणारा भारतीय थिंक टेंक म्हणजे आंग्ल भाषा जाणारे अधिकारी, विशिष्ट विश्वविद्यालयांंत शिकलेले विचार जंतू.  या  लोकांना देशापेक्षा स्वत:च्या हिताची जास्त चिंता असते. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी  भारताने नमते घ्यावे असाच त्यांचा नेहमी सल्ला असतो. आपले राजनेता त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यानुसार रणनीती आखतात. शिवाय भारतीय बुद्धीजीवी (बुद्धी नसलेले) आणि मिडिया (?) पाकिस्तानशी संबंध कसे  चांगले करावे यावरच जोर देतात. 

युद्ध हा शेवटच पर्याय असतो. कधी कधी युद्धात विजयी सुद्धा पराजित ठरतो. हजारोंच्या संख्येने सैनिकांचा जीव जाऊ शकतो. देशाला हि अतोनात नुकसान होते.  पण आपल्या सैनिकांचे रक्त काही पाणी नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष  करणे हि उचित नाही  (आतापर्यंत आपण हेच करत आलो आहे).  पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी युद्धाशिवाय जे काही उपाय करता येणे शक्य आहे, शीघ्र केले पाहिजे. 

भारताने स्पष्ट करावे जो पर्यंत पाकिस्तान आतंकवादी हाफिज सईद, मसूद अझहर इत्यादींना भारताच्या हवाली करत नाही तो पर्यंत कुठली हि वार्ता भारत पाकिस्तानशी करणार नाही. अर्थात अश्या घोषणांचा पाकिस्तानवर काहीही प्रभाव पडणार नाही. मग पुढे काय?

गांधीजीनी अहिंसा आणि असहयोगचा मंत्र दिला होता.  आपण गांधीचींचा असहयोग मंत्राचा वापर 'सरकारात इच्छा शक्ती असेल तर उद्याच पासून सहज करू शकतो.  म्हणतात न,  प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतो. पाकिस्तान जर  नंगा झाला आहे तर  असहयोग मंत्राचा वापर करताना नीती मर्यादा विसरून नग्न व्हायला हरकत नाही. पाकिस्तानी जनतेला कळेल असे उपाय केले पाहिजे. 

बॉलीवूडचा प्रभाव पाकिस्तानी जनतेवर आहे. पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना भारतात काम करायला तत्काळ पाबंदी लावली पाहिजे. या शिवाय त्यांचे गाणे इत्यादी भारतातल्या कुठल्याही प्रसार माध्यमांत दाखविण्याची बंदी मग गुलाम अली का असोना.

पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणे सोडावे व  देशात प्रसार माध्यमांना पाकिस्तानी क्रिकेट दाखविण्यावर पाबंदी लावावी.  या शिवाय जो  देश पाकिस्तान सोबत क्रिकेट संबंध ठेवेल किंवा मालिका खेळेल त्या सोबत भारत  खेळणार नाही असे धोरण आखण्यात क्रिकेट बोर्डला बाध्य करणे. मग वर्डकप का असेना. (८०% रेवेन्यु आपण देतो, बेशरम बनायला हरकत नसावी).  

जगाला स्पष्ट सांगावे सिंधू नदी समझौता भारताला मान्य नाही. आज पासून भारत आपल्या गरजेचे पाणी वापरल्यानंतर उरलेलेच पाणी पाकिस्तानला देणार. तत्काळ रावी- व्यास लिंक नहर बनविण्याची घोषणा करावी. (उद्याच करता येते). युनो किंवा इतर अंतराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानने किती हि ओरड केली तरी त्या कडे लक्ष्य देण्याची गरज नाही. या घटकेला कुठलाही देश आपल्यावर दबाव टाकू शकत नाही. स्पष्ट सांगावे आतंकवाद पोसाणार्यांना आम्ही पाणी देऊ शकत नाही. पाणी  किंवा आतंकवाद हे गणित पाकिस्तानला मान्य करावेच लागेल. युद्ध पुकारणे पाकिस्तानच्या बसचेही नाही, हे ध्यानात ठेवा. तसे असते तर काश्मीर वरून केंव्हाच युद्ध सुरु केले असते. 

शिवाय इतर अन्य उपाय पण उद्या पासून अमलात आणू  शकतो, उदा: वाघा बोर्डर वरची सेरेमनी बंद करता येते. केलीच पाहिजे.  समझौता गाडी, बस सर्विस तत्काळ प्रभावाने बंद करावी. या सेवा बंद झाल्याने जास्त नुकसान पाकिस्तानचे आहे. 

अर्थातच  तथाकथित  बुद्धीजीवी  वरील उपायांचा विरोध करतील.  पण अश्या मूर्खांची पर्वा करायची गरज नाही.  क्रिकेट आणि पाण्याची भाषा पाकिस्तानी जनतेला व राजनेत्यांना  चांगलीच कळेल.  

Sunday, September 11, 2016

विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले




सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता.  वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव.  बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे  गेली नाही.  दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही.  त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल.  याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात. 

आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य. 

योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा  शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे.  विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे,   जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे.  पुढ्या सहा महिन्यातच  या फूड पार्कच्या   काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे.  दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर  नागपूर  येथील फूडपार्क  जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल. 

साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात  विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले  आहे. 






Sunday, September 4, 2016

स्वादिष्ट आटा नूडल्स






काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते.  मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण  मैदा वाले नूडल्सच्या  जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा  बाहेर पडला. 

घरात कांदे होते,  टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले.  फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील.  एक हिरवी मिरची हि घेतली.  सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले.  आमचे  चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला. 

गॅस वर  पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली.  मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली. 

गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद  आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात  घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले.  

गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता. 




भाज्यांचे लोणचे


Friday, September 2, 2016

गाडीला अपघात होऊ दे बाप्पा ..


यंदा बळीराजाला कांदे  ५ पैशे किलोच्या भावाने  विकायची पाळी आली. आता डाळींचे भाव हि गडगडले. पहिले बळीराजा दुष्काळात मेला आता पाण्यात नक्कीच बुडणार आहे. प्रभूंच्या  कृपेने  रेल्वे ९२ पैश्यात १० लाखांचा विमा यात्रेकरूंना देणार आहे. जगण्याला कंटाळलेला निराश बळीराजा जर तिकीट घेऊन रेल्वेच्या गाडीत बसला तर त्याच्या मनात काय विचार येतील: 

गाडीला अपघात 
होऊ दे बाप्पा 
मला मरण 
येउ दे बाप्पा. 

विम्याचे पैशे 
मिळू दे बाप्पा.
मुलांचे शिक्षण 
होईल बाप्पा. 

शहरात नौकरी 
मिळू दे  बाप्पा.
उपासमार 
थांबेल बाप्पा. 


Thursday, September 1, 2016

ताजी क्षणिका - आठवली मग जात त्याला



दिल्लीत आजकाल  काय  चालले  आहे, काही  कळत  नाही.    आज एका मंत्र्याची (महिला आणि बाल कल्याण मंत्री) सीडी समाचार वाहिनींवर दाखविल्या गेली, त्याला त्यागपत्र द्यावे लागले. आपल्या बचावासाठी त्याला जात आठवली:   

महिला कल्याण करता करता 
सीडीत अटकला आपला  नेता 
गादी गेली, धम्म पडला 
आठवली मग जात  त्याला.