Sunday, July 28, 2013

प्रेम आणि गालावरचे खड्डे



मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या बातम्या दूरदर्शन वर येत होत्या, माझ्या एका मित्राने या बाबत मला काही प्रश्न विचारले. त्याच्या मनातले बहुतेक प्रश्न आपण सर्वांच्याच मनात डोकावत असेल. म्हणून विचारलेल्या प्रश्नांचे समाधान कारक उत्तर देण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे.

पहिला पाऊस पडल्याबरोबरच मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. हिरव्यागार वस्त्रांनी नटलेली धरती, हिरव्या शालू नेसलेली भारतीय परंपरेत वाढलेल्या नववधू सारखी दिसते. पतिदेवांच्या  पहिला-पहिला स्पर्श होताच, आपली भारतीय नववधू लज्जेने चूर-चूर होते. तेंव्हा तिच्या गालावर सुंदर-सुंदर खड्डे पडतात. खड्डे पडलेल्या सुंदर, मोहक आणि मादक पत्नीस पाहून, पतीदेव तिच्या वर प्रेमाचा वर्षाव करणारच.  त्याच बरोबर गालावर लज्जेचे खड्डे ही अधिक पडणारच. 


आपले रस्ते ही आपल्या भारतीय परंपरेला जपणारे आहेत. कितीही डाबर किंवा सिमेंट कांक्रीटनी बनलेले असो, पाऊसाचा प्रथम प्रेमळ स्पर्श झाल्या बरोबरच, नववधू सारखे रस्ते लज्जेने चूर-चूर होतात आणि त्यांचा गालावर खड्डे पडतात. रस्त्याचं हे सुंदर मोहक रूप पाहून, प्रेमाचा पूर हा रस्त्यावर वाहणारच आणि मोठ्या संख्येने रत्यावर खड्डे ही पडणारच. त्यात नवल काय?  पुन्हा प्रश्न उभा राहतो, आपल्याच देशात रस्त्यांवर खड्डे का पडतात? पाश्च्यात देशांत का नाही? उत्तर सोपे आहे, पाश्चात्य देशांत, जिथे लोकांना सार्वजनिक प्रेम प्रदर्शन करण्याची मुभा आहे. तिथली नववधू पहिल्या रात्रीत लाजत नाही आणि तिच्या गालावर खड्डे ही पडत नाही. मग प्रेम वर्षावाचा प्रश्नच येत नाही. प्रेमाच्या अभावी त्यांचा संसार ही फार काळ टिकत नाही.(हा वेगळा भाग आहे). मुद्दा हा, तिथले रस्ते ही तिथल्या स्त्रीयांसारखे लज्जेहीन असतात,  मग त्यांच्या गालांवर खड्डे पडणार तरी कसे?

माझ्या मित्राने पुहा प्रश्न विचारला, पाऊसाचे आणि रस्त्यांचे प्रेम -बीम हे सर्व ठीक आहे. पण त्यांच्या प्रेमाचे परिणाम आपल्याला का भोगावे लागतात? दरवर्षी कित्येक वाहने खड्यात पडतात, कित्येक लोक जखमी होतात, कित्येकांची तर थेट  रवानगी देवाघरी होते. शिवाय दररोज होणारऱ्या ट्राफिक जाम मुळे कार्यालयात पोहचायला उशीर होतो व घरी यायला ही.


मी उतरलो, दोन जीव प्रेमात मग्न असताना, त्यांना त्रास देणे योग्य नाही. अशा वेळी रस्त्यांवर जाणे म्हणजे त्यांचा प्रेमात बाधा उत्पन्न करणे होय. प्रेमी जीवांना त्रास देणाऱ्यांना देव क्षमा करत नाही. अश्या लोकांना परिणाम भोगावेच लागतात. त्यात रस्त्यांचा काय दोष. पाऊस सुरु असताना चक्क दांडी मारून घरी बसावे हेच योग्य. म्युनिसिपाल्टी ने किती ही खड्डे बुजविले तरी ही प्रत्येक पाऊसात रस्त्यांच्या गालावर खड्डे हे पडणारच कारण पाश्चात्य स्त्रियांप्रमाणे आपल्या रस्त्यांनी लज्जा सोडलेली नाही. पाऊस आल्यावर त्यांचा गालावर खड्डे हे पडणारच उगाच म्युनिसिपाल्टी किंवा रस्त्याला शिव्या देण्यात अर्थ नाही. प्रारब्धाचा स्वीकार करावा हेच योग्य. असो

Saturday, July 20, 2013

कविता, मीटर आणि मी


माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलोआहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर? असे म्हणत ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ या धर्तीवर’ तो कवितेची चोपडी चाळू लागला. मी ही कान टवकारून, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानी तो उद्गारला, लेका, कविता छान आहे, आवडल्या (?), पण एक ही कविता मीटरमध्ये नाही, आणि खरंच सांगतो, बिना मीटरच्या कवितेची मार्केट वेल्यू नसते, कवीला प्रतिष्ठा ही मिळत नाही आणि मोबदला ही, असे म्हणत एखाद्या खलनायका प्रमाणे माझ्या कडे पाहत, तो खदा-खदा हसू लागला. त्या वेळी त्याचा चेहरा, मला चक्क ब्रूटस सारखा वाटला, ‘ब्रुटस तुम भी’ एवढेच म्हणायचं काय ते राहिलं. पण एक खरं त्याचा घाव जिव्हारी लागला. त्या दिवसापासून एक ही कविता सुचली नाही.

कवितेच मीटर म्हणजे काय, हा एकच प्रश्न सतत डोक्यात घोळू लागला. आज सकाळी विजेचे बिल आले. आजकाल विजेचे बिल पाहून हादरा हा बसतोच. किती ही कमी वीज वापरली तरी बिल दीड-दोन हजारापेक्षा कमी येत नाही. विजेचे निजीकरण झाल्याचा परिणाम. कंपनीने जुने मीटर बदलले, नवीन डिजीटल मीटर आले, ते वेगाने पळतात. ऊर्जा मंत्रालयात काम करणाऱ्या एक सहकर्मिला, या बाबतीत विचारणा केली होती. तो म्हणाला, मीटरच्या अचूकते बाबत काही प्रतिशत (+, -) ची सूट निजी कंपन्यांना मिळाली आहे, त्याचा गैरफायदा या कंपन्या घेतात. सर्वच मीटर (+) असतात. निष्कर्ष- मीटर आहे म्हणून आपण विजेचे बिल देतो, ‘मीटर वेगाने पळतात, आणि आपल्याला वीजेसाठी जास्त पैसा मोजावा लागतो’. दिल्लीत आटो, पूर्वी कधीच मीटरने पळत नसे, आजकाल मीटरने जायला तैयार राहतात. कारण नवीन मीटर आटोपेक्षा ही जास्तवेगाने पळतात. गेल्या रविवारी कुठे बाहेर जायचे होते, गल्लीत एक आटो उभा होता, आटोवाल्याला विचारले, तो म्हणाला साहब मीटर खराब है, मीटर ठीक होने तक सवारी नाही बिठा सकता, मी- बिना मीटर के चल. तो- ‘बिना मीटर के में मुफ्त में भी किसी को नही ले जा सकता, चलान कट जायेगा’. माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली, प्रकाश पडला, एक - बिना मीटर आटो ही रस्त्यावर धावू शकत नाही, दोन- ‘मीटर असेल तरच मोबदला मिळतो’.

त्याच संध्याकाळी, एका कवी/ गीतकारची मुलाखत दूरदर्शन वर पहिली. तो म्हणत होता, त्याला संगीतकाराच्या चालीवर गाणे लिहिणे जास्त सौपे वाटते, कविता पटकन मीटरमध्ये बसविता येते. कविता आधी लिहिली असेल तर चालीनुसार मीटरमध्ये बसविणे कठीण जाते. हा त्याचा अनुभव. मीटर मध्ये बसणाऱ्या कविता लिहिणाऱ्या गीतकाराला नक्कीच भरपूर मोबदला मिळत असेल. खरंच जिथे मीटर तिथे मोबदला/ पैसा. मग विजेचे मीटर असो, आटोचे असो किंवा कवितेचे.

डोक्यात गोंधळ माजला, अनेक प्रश्न उभे राहिले, विवेक पटाईत तुम्ही मीटर मध्ये कविता लिहू शकतात का? हृदयातून उत्तर आले - शक्यच  नाही. बिना मीटरच्या कवितेला बाजारात किंमत नाही, मग तुम्हाला आयुष्यात कधी प्रतिष्ठा आणि नाव मिळेल का? प्रतिष्ठा व नाव नसलेल्यांना कविसंमेलनात कुणी बोलवतो का? कुणी कविता छापतो का? माझ्या एका दिल्लीकर कवी मित्राने स्वत:च्या खर्चाने नागपूर हून आपले दोन-तीन कविता संग्रह प्रकाशित केले आहे (५००च्या आवृतीचे, १५ ते वीस हजार खर्च येतो असे तो म्हणाला होता). पुस्तके किती विकल्या गेली त्यास माहीत नाही. कारण रॉयल्टी त्याला कधीच मिळाली नाही.

आपण काय विचार करतो आहे, या विचाराने मला माझेच हसू आले. तुलसीदासाला कुठल्या ही राजाच्या दरबारी ‘राजकवीचे’ पद सहज मिळाले असते. पण तुलसीदासाने काशीच्या घाटावर, स्वांत सुखाय ‘रामचरितमानस रचले’ होते, कुठल्या ही मोबदल्याचा विचार न करता. त्या वेळी आत्मशून्य झालेल्या लोकांना राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हाच रामचरितमानस रचण्याचा त्यांचा कदाचित उद्देश्य असेल. शेवटी स्वत:लाच म्हणालो, विवेक पटाईत, आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करू थोडे ही यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.