Sunday, July 31, 2011

समलेंगिकता एक विकृती



कालच वर्तमान पत्रात वाचल  हरियाणाच्या एका कोर्टाने समलेन्गिक जोडप्याच्या संरक्षण देण्याचे आदेश दिले  कारण समाज  त्या जोडप्याच्या जीवावर उठलेला आहे.  समाज समलेन्गिक संबंधाना एक विकृती म्हणून पाहतो आणि अश्या संबंधांचा विरोध करतो. तर दुसरी कडे काही बुद्धीजीवी (?) अश्या संबंधाना कायद्याचे संरक्षण देणे काळाजी गरज आहे असे मानतात. सरकारने कायदा बनवून समलेन्गिक विवाहाला मान्यता द्यावी अशी त्यांची अपेक्षा. प्रत्येक माणसाला त्याचा हिशोबाने जीवन जगण्याची स्वतंत्रता आहे आणि या स्वतंत्रेच रक्षण करण सरकारच दायित्व आहे. 

आपण परमेश्वराच्या 'अर्ध-नारीश्वर' या स्वरूपाचे पूजन करतो.  स्त्री-पुरुषाचे मिलन मानवजातीच्या अस्तित्व करता आवश्यक आहे याचेच प्रतिक म्हणजे "अर्धनारीश्वर".   आपणास माहित आहे, परमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला "बिग बैंग" असे म्हणतात.  त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव " एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून  सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे.  एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे.  हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसर्या कडे आकर्षित होतात.  स्त्री 'बीज',  पुरुष वीर्य ' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते.    स्त्री-पुरुषांच्या मिलनाचा मूळ उदिष्ट संतान प्राप्ती होय या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते.   केवल यौन आनंदा साठी  होणार्या  स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या सम्बंधान मुळे विकृत संतती निर्मित होते.  म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी,  स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना 'विवाह' या रूपाने परिभाषित केले.

समलेन्गिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची  'एका पासून अनेक होण्याची'  मूळ इच्छा  पूर्ण करू शकतो का?   आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही.  समलेन्गिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही.  आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलेन्गिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुरू आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो  जिथे पुरुष वीर्य आणि स्त्री बीज फलित होऊ शकत नाही अश्या मानवजातीला विनाश्याच्या मार्गावर नेण्यार्या समलेन्गिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात.  खरे म्हणजे समलेन्गिक्ता माणसात दडलेली  एक विकृती  आहे. एक मानसिक बिमारी आहे.  सम लेन्गिक व्यक्ती कडे सहानभूतीने पाहून,  योग्य डॉक्टरी सल्ला आणि  चिकित्सा केल्यास त्याला या  विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते.  समलेन्गिक्तेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. मानसिक रोगाने झपाटलेल्या समलेन्गिक समर्थकांचा विरोध कारणे ही काळाजी गरज आहे. 

Tuesday, July 12, 2011

क्षणिका / रात्र श्रावणी /मृगाचा पाऊस/ कोरडा समुद्र


मृगाचा पाऊस

मृगाच्या पाऊसात
चिंब भिजली.
शरदाच्या कुशीत
धरणी प्रसवली.

कोरडा समुद्र

विरही वेदनेचा
खाऱ्या अश्रूंचा
समुद्र कोरडा.

रात्र श्रावणी

प्रेमात भिजली
रात्र श्रावणी.
गालावर लाली
पहाट सोनेरी.

 [एकत्र चालत असूनही धरती आणि समुद्राचे कधीच मिलन होत नाही. खाऱ्या अश्रूंचा समुद्र    प्रेमाचा गोड ओलावा   आणणार तरी कुठून?] 

Saturday, July 9, 2011

ती आठवण, ते सूर आणि मी


क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस - सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नवे वळण देते. निराशाच्या गर्तेत बुडालेल्या मनात आशेचा संचार होतो. असाच एक अनुभव.
वर्ष  २००७, मईचा महिना, काही महिन्यांपासून पाठीचे मणके आपल्या जागेवरून हलल्यामुळे  कमरेचे  दुखणे  वाढत होते. डॉक्टर कोठारीनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण आपण मराठीमाणूस. कामाप्रती अधिक निष्ठावान. मग व्हायचा तोच परिणाम झाला. त्यावेळी कार्याचा अधिकतेमुळे रोजच रात्री उशीर अर्थात घरी पोहचता-पोहचता रात्रीचे १० तरी वाजायचे. एक दिवस रात्रीचे जेवण घेतल्यानंतर वाशबेसिन वर हात धुवत असताना पाठीत असंख्य विजा चमकतात आहे असे वाटले. डावा पाय सुन्न झाला. असंख्य वेदना कमरे व पायातून उमटल्या. डावा पाय सरळ करता येत नव्हता कसेबसे  रात्र  जागून काढली. सकाळी एम्बुलेन्स बोलवली.  स्ट्रेचर  टाकून मला सफदरजंग हॉस्पिटलला नेले. पेशंट पहायचा दिवस नसतानाही  डॉक्टर कोठारी मला बघण्यासाठी हॉस्पीटला आले. डॉक्टरांचं न ऐकणार्या पेशंटच आणखीन काय होणार, आपण  पंधरा-वीस  दिवस वाट पाहू,  काही फरक पडला तर ठीक, अन्यथा ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. बिस्तरावर न हलता-डुलता पडून राहाण्याचा सख्त आदेश ही मला दिला. खंर म्हणाल तर त्या वेळी जरा ही पाय हलला तर एवढ्या वेदना होत होत्या की हालण- डुलण शक्यच नव्हत.  म्हणायला सोप आहे,  "प्रात:विधी" पासून सर्वकाही बिस्तरावर  करताना,  शरीरापेक्षा मनाला किती यातना होतात, हे रोगीच जाणतो.  असेच १० ते १२ दिवस  उलटले, वेदना किंचित ही कमी होत नव्हत्या. रात्री छोट्या स्टूल वर पाय ठेउन झोपण्याचा असफल प्रयत्न करायचो.  झोपेचा अभाव आणि दुखण याचा परिणाम शरीरावर व मनावर होऊ लागला होता. कदाचित आपण कधीच बिस्तरावरून उठू शकणार नाही असे वाटू लागले होते त्या मुळे मनात निराश्याची भावना दाटू लागली होती.

मग तो दिवस उगवला. रात्रीची वेळ होती, झोपण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात बायको म्हणाली,  "सा  रे ग म"  पुन्हा सुरु झाल आहे.  गाणे ऐका थोड बर वाटेल अस म्हणत तिने टीवी लावला. पण वेदने मुळे गाणे ऐकण्यात लक्ष लागेना

अचानक  "क्षण दिपती क्षण लपती,  भिजुनी उन्हें चमचमती"  हे  सूर काना वर पडले.  अचानक  पंचवीस पूर्वीची घटना डोळ्यांसमोर तरळली,  पावसाळ्याचे दिवस होते. श्रावणाचा महिना असल्या मुळे ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. ऑफिस सुटल्या वर चार्टर बस साठी वाट पाहत कृषी भवनच्या बसस्टाप वर उभा होतो.  क्षणभरा करता पावसाची एक जोरात सर आली आणि चिंब भिजवून गेली. पुन्हा ऊन निघाले. अचानक डोळे प्रकाशात दिपले. वळून बघितले तिच्या सोनेरी केसात अडकलेल्या पावसाच्या थेम्बातून परावर्तीत होऊन सूर्य प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडत होता.   पांढर्या सलवार-कुर्त्यात  भिजलेली ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या वरून दृष्टी हलत  नव्हती. काही क्षणानंतर  वरती आकाशाकडे बघितल सूर्यदेव ही ढगाचा परदा सारून भिजलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. मला हसू आले. मनातल्या मनात शीळ घालत पुटपुटलो  "सूर्यदेव तुम्हीही आमच्या सारखे, दिसली पोरगी की शीळ घातली.  तुम्हाला स्वर्गात अप्सरांची काय कमी, पृथ्वीवरच्या सौंदर्याला का म्हणून बघता.  काही आमचा विचार करा." तेवढ्यात  चार्टर बस आली. बस मधे चढलो. खिडकी जवळची सीट मिळाली. बस सुरु झाली. सहज लक्ष गेल, पश्चिम दिशेला आकाशात इंद्रधनुष्य उमटलेल दिसत होत. गाण संपता-संपता  केन्हां  डोळा लागला कळलंच नाही.  दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर जाणवलं, वेदना पुष्कळ कमी झालेल्या होत्या. पाया खालचा स्टूल दिसत नव्हता. झोपेत पाय आपोआप सरळ झाला होता. बायकोचा चेहरा ही आज उजळल्या सारखा दिसत होता. इतक्या दिवसांपासून  ती पतिव्रता ही नवर्या बरोबर रात्र जागून काढत होती. काल छान झोप लागली वाटत. तुमच्या साठी 'पॉट'  घेऊन येऊ का, तिने विचारले. मी म्हणालो, आज बिस्तरावर नाही.  मुलाच्या मदतीने toilet पर्यंत गेलो.

रात्री ऐकलेले ते सूर आठवले, ती आठवण ही डोळ्या समोर आली. खरोखरच संगीतात एवढी शक्ती असते की एका रात्रीत वेदना कमी होतात व शरीरात नवीन चैतन्य निर्माण होते. नंतर कळले ती गायिका सायली पानसे होती.  हळू हळू तब्येतीत सुधारणा होऊ लागली.  सप्टेंबर महिन्याचा अखेरीच ऑफिस जॉईन केल. माझ्या ठीक होण्यात डॉक्टर कोठारींचा मोठा वाट होता यात शंका नाही. पण त्या दिवशी ऐकलेल्या त्या सुराचा व त्या आठवणीचा ही मोठा वाटा आहे हे ही तेवढंच सत्य. 

Saturday, July 2, 2011

जाहिरात आणि सदोबा / (वात्रटिका)

सदोबा जाहिरातीला भुलून नेहमीच खरेदी करतो. पण जाहिरातीत दिलेला इशारा त्याला समजत नाही "डाग चांगले असतात" असं चक्क जाहिरातीत म्हंटले असतानाही सदोबाने ते साबण खरेदी केले. मग काय जाहले असेल:

ब्रान्डेड साबणाने
सदोबाने कपडे धुतले.
डाग चांगले-चांगले
कपड्यावरती उमटले.

सदोबाचे दात दुखत होते. दाताचा परमनेन्ट इलाजासाठी आमचे टूथपेस्ट वापरा 'दात स्वच्छ होतात', ही जाहिरात बघून सदोबाने टूथपेस्ट विकत घेतली. पुढे काय जाहले: 




ब्रान्डेड टूथपेस्टने
दात स्वच्छ केले.
आता पांढर्या शुभ्र दातांची
कवळी सदोबा लावितो.


सदोबाने आपल्या बायकोसाठी जाहिरातीत हिरोईनने वापरलेले 'आल क्लिअर' शेम्पू आणले. पुढे काय जाहले असेल:



डोक्याला तिने
आल क्लिअर लाविले.
विग घालूनी ती आता
छान - छान दिसते. 


'आल क्लिअर' चा अर्थ सदोबाला कळला असता तर बायकोसाठी विग विकत घेण्याची नौबत आली नसती. एक मात्र खंर, तेल आणि शेम्पूचा खर्च वाचला. जाहिरातीला दोष देण्यापेक्षा जाहिरातीत दिलेला इशारा समजण्याची गरज आहे. हे सदोबाला तरी आता नक्की समजले असेल.