Monday, April 18, 2011

ययाति-- ययातिच्या मनातिल द्वंद्व




भोग आणि लालसा मनुष्याला कुठे घेऊन जाईल- अतृप्त मनुज- काचालला आहे विनाशाचा मार्ग वरमार्गावर - ययातिच्या मनातिल द्वंद्व

क्षमा, दया आणि सहिष्णुता
आहेत मानवतेची भूषणं
आहे त्यागसहित भोगच
मानव जीवनाची सार्थकता हे जाण.
इति ऋषि वचन.

पाहुनी चिरकुमारी
अक्षय अखंडित वसुन्धरेला
विसरून गेला
ययाति ऋषि वचनाला. म्हणाला,
"क्षमा आणि दया
आहे दुर्बलांचे वचन
वसुंधरा आहे वीरभोग्या दुर्बलांना नाही इथे
अधिकार जगण्याचा."

पायदळी तुडवलं त्यानी
शुद्रतम जीवनं
मोठी होती बनली तीही
मृगया मनोरंजनाची साधनं.

राक्षसी अट्टाहास करीत
विक्षिप्त बलात्कारी मनुष्य
तुटुन  पडला धरतीवरी
टर्र फाडली की तो त्यानी
वसुधेची वसने पूरी.


धरतीच्या कोमल हृदयात हि
खोल रुतवले अपुले राक्षसी दात
सर्वत्र पसरल्या घावांतून
विषाक्त वायु पसरु लागला
प्राण त्यात ययातिचाही
कासाविस मग झाला.

स्वर्गस्थ देव ओरडले
"धरणीशी बांधली आहे
तुझ्या जीवनाची गाठ
त्यागून भोगाचा वसा
वाचव आपल्या धरणीला".

बघुन धरतीची दशा
करू लागला ययाति विचार
की शोधली पाहिजे आता
अंतरिक्षात  दूसरी धरा कुठे तरी दूर.
किंवा
आपल्या शक्तिने देवताना करेन च्युत
मग भोगू शकेन स्वर्णिम स्वर्गातुन
अप्सरांना  नित-नवीन.कदाचित!अक्षय अमृताचे पात्रच
भागवू शकेल माझी तहान.

काळातच दडलेलं आहे
भाग्य मनुष्य पुत्राचं
त्यजुन नीच भोग मार्ग
धरेल का ययाति
त्याग-तपस्येचा मार्ग?

की हरवून जाईल
मनुष्य पुत्र
अंतरिक्षाच्या असीम
अंधारात?

सध्या तरी ययाति
किं कर्तव्यमूढ़.
विचारात.   

Wednesday, April 6, 2011

नाव ,विवाद आणि पैसा / गणितीय समीकरण



आजच्या माहिती युगात नावाला अत्यंत महत्व आहे. डोक्याला लावणाऱ्या तेला पासून ते पायातले जोडे नावामुळेच विकले जातात. आज प्रत्येक नाव एक ब्रांड आहे आणि त्याची एक विशिष्ट कीमत आहे.  एका रामायणातला प्रसंग आहेवानरांनी 'राम' नाव  लिहलेले दगड  समुद्रात फेकले, ते पाण्यावर तरंगू लागले. भगवंतांनी ही एक दगड समुद्रात टाकला. पण तो दगड पाण्यावर तरंगला नाही.  सर्वाना आश्चर्य वाटले.  दगड भगवंतानी टाकला असला तरी त्या दगडावर 'राम' लिहिलेले नव्हते म्हणून तो बुडाला. अशी नावाची महिमा आहे. नावाला मिळणार्या किमतीसाठी नेता असो  अथवा कलाकार सतत धडपडत असतो. आज जर शेक्सपिअर हयात असता तर 'नावात काय आहे' अस म्हंटले नसतेसमर्थांनी म्हंटले आहे  " व्याप आटोप करिती. धके-चपेटे सोसती. तेणे प्राणी सदेव होती. देखत देखता". पण या साठी वेळ फार  लागतो.  खडतर तपस्या करावी लागते.  तेंव्हाच कोणी 'तेंडूलकर' किंवा लता मंगेशकर बनतो.

पण नाव कमविण्याचा एक सोपी मार्ग पण आहे. एका शायरने म्हंटले आहे  "बदनाम होंगे तो क्या नाम   होगा".  आज चित्रकार म्हंटल की डोळ्या समोर कुर्ता-पजामा  घातलेला दाढीवाला म्हातारा अर्थात फिदा हुसैन  डोळ्या समोर पटकन येतो. हुसैन साहेबाना नाव कमविण्याचा सौपा मार्ग सापडला होता. ते सतत विवादात राहतात, कित्येक खटले त्यांचा विरुद्ध सुरूच असतात. पण त्याचं नाव प्रचार माध्यमात या ना त्या कारणाने सदैव झळकत राहते. या मुळे त्यांचा नावाची मार्केट वेल्यू सतत वाढत राहते. आज कला जगतात हुसैन एक प्रसिद्ध 'ब्रांड नेम' आहेसुंदर चित्रा खाली जर 'नाव' नसेल तर ते कुणीही विकत घेणार नाही.  पण  चार आडव्या-तिरप्या रेषा  काढलेल्या  चित्रा खाली जर 'हुसैनहे नाव असेल तर तथाकथित  कला प्रेमी  लाखो रुपये खर्च करून  ते चित्र विकत घेतात.  कारण नावाला कीमत आहे कलाकृतीला नाही. राखी सावंत आणि मिकाचे चुम्बनही प्रचार माध्यमातून फार गाजले होते.  राखी सावंतचे ही 'नाव' झाले आणि मिकाचेही.  आता दोघ भरपूर पैसे कमवितात आहे.

नाव, विवाद आणि पैसा हे समीकरण गणिताच्या भाषेत आपण सहज मांडू शकतो.

नाव + विवाद = प्रसिद्धी (नावाची मार्केट वेल्यू  )
प्रसिद्धी  =  पैसा 

प्रसिद्धी + विवाद = अधिक प्रसिद्धी + अधिक पैसा ....

पूनम पांडे नावाच्या  मॉडेलला काही दिवसांपूर्वी कुणीही ओळखत नव्हत. पण खेळाडूंसाठी 'विवस्त्र' होण्याची तिच्या नुसत्या विधानाने  तिचे नाव प्रचारमाध्यमातून शंभर कोटी लोकां पर्यंत पोहचल. साहजिकच आहे काही वकीलही नावासाठी तिच्या विरुद्ध खटले कायम करतीलच. अर्थात विवाद हा निर्माण होणारच आणि भविष्यातही तिचे नाव प्रचार माध्यमात झळकत राहणारचअशाने तिची मार्केट वेल्यू ही वाढेलच.  प्रसिद्धी आणि पैसा कमविण्याचा सोपी मार्ग तिला कळला आहे हे निश्चित.