Monday, September 1, 2014

वरुण राजाला साकडं



श्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.

साकडं घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला  
वादळ फोडून पाऊस बरसला.

गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.

वरुण राजा
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा
का हिशोब घेतो आता?

झाल्या चुका माफ कर
कृपा कर पामरांवर
साकडं घालतो तुझ्या चरणी
पुढच्या वर्षी तरी
पाऊस पाड नेमान.



  

No comments:

Post a Comment